महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने सोमवारी उशिरा त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडले आहेत.पाऊस लांबण्याची शक्यता लक्षात घेऊन ३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या अतिरिक्त ४५ दिवसांच्या पाण्याच्या नियोजन करण्यासाठी एप्रिल महिन्यापासूनच पाणी कपात करण्याची आवश्यकता होती, परंतु तब्बल दीड महिना उशिरा मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एमआयडीसीने हा निर्णय घेतला आहे. त्यातही आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्याऐवजी १५ दिवसांनी पाणीकपात केली जाणार आहे. पाऊस पडून धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत ही पाणी कपात कायम राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, अपव्यवय टाळावा, असे आवाहन पाणीपुरवठा यंत्रणांनी केले आहे.
या विभागांना फटका बसणार
काटई नाका येथे जलवाहिनी फुटली
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मुख्य जलवाहिनी काटई नाका येथे अचानक फुटल्याने मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. एमआयडीसीकडून ठाणे जिल्ह्यातील शहरांना घरगुती वापरासाठी तसेच औद्योगिक वसाहतींसाठी पाणीपुरवठा होतो. पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे प्रशासनाने कळवले.
ठाणे जिल्ह्यास पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या बारवी धरणात २३ मे रोजी ३३.७९ टक्के तर पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंद्रे धरणात ३६.७६ टक्के पाणीसाठा आहे.
