यात्रेला पोहोचण्याआधीच मुंबईकर कुटुंबावर काळाचा घाला,

गावच्या पारंपरिक यात्रेला पोहोचण्याआधीच मालाड व बोरिवलीतील चौघांवर काळाने घाला घातला. या रस्ता अपघातात मालाड येथे वास्तव्यास असलेल्या काशिद कुटुंबातील दीर व वहिनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात सांगली जिल्ह्यातील विट्याजवळ सातारा-विटा राज्य महामार्गावर झाला.

 मुंबईतील मालाड पूर्व येथील नोबेल हाईट सोसायटीत राहणारे सदानंद दादोबा काशिद हे पत्नी सुनीता, सख्खा भाऊ चंद्रकांत दादोबा काशिद व अशोक सूर्यवंशी यांच्यासह विट्याजवळील गव्हाण येथील गावी असलेल्या वार्षिक जत्रेसाठी जात होते. यासाठी त्यांनी खासगी गाडी केली होती. मात्र विट्याजवळ असताना एका ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना समोरुन जोरदार धडक दिली.त्यामध्ये सदानंद यांच्या पत्नी सुनीता, भाऊ चंद्रकांत व अशोक सूर्यवंशी यांचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच मागाठाणे येथील रहिवासी असलेले कार चालक योगेश विलास कदम हेदेखील बसच्या धडकेत चेंगरले गेल्याने जागीच मृत पावले.
ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चारचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीतून प्रवास करणारे चौघे जण जागीच मृत्युमुखी पडले. गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने सदानंद काशिद बचावल्याची माहिती. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *