राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द, परळी कोर्टाचा निर्णय

राज ठाकरे परळी न्यायालयात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याशिवाय, राज यांना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘राज ठाकरे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. बराच काळ घोषणाबाजी सुरु होती. यामुळे न्यायाधीश चिडले. अखेर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत राज ठाकरे न्यायालयाच्या आतमध्ये पोहोचले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांचाच युक्तिवाद झाला आणि राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *