दहावी बारावी बोर्डाची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट; …तर थेट नापास व्हाल

शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरून सुरू झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाला. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०, आवळी पैकी पोवारवाडी) असे मृत मामाचे नाव आहे. या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील जखमी भगवान महादेव पाटील रा. आवळी पैकी पोवारवाडी यांनी फिर्याद नोंदवल्यावर पोलीसांनी संशयित प्रवीण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघे, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी)ता. पन्हाळा या चौघांना पोलीसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती अशी की, भगवान महादेव पाटील आणि संशयित आरोपी प्रवीण पाटील, प्रदीप पाटील, विश्वास पाटील हे एकाच गावातील असून एकमेकांच्या घरासमोर राहतात. कोल्हापूर-रत्नागिरी रोडसाठी भूसंपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरून मागील पंधरा दिवसांपासून वाद सुरू होता. भगवान पाटील घराचे दारात हातपाय धूत असताना संशयित प्रवीण पाटील याने शिवीगाळ करून भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली. हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडविण्यासाठी गेले असता सर्व संशयितांनी रघुनाथ पोवार यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच संशयितांनी घराचा दरवाजा तोडून आतमध्ये बसलेला मुलगा प्रतिक याला दगडाने मारहाण करून दहशत माजवली. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पाटील ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून संशयितांना अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *