मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लॉकडाऊनबाबत शेवटचा इशारा, येत्या २ दिवसात निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मार्चच्या आधीपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

– जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पूर्ण लॉकडाऊन करावे लागेल की काय अशी शक्यता होती.
– अमेरिकेत ७ कलमी कार्यक्रम जाहीर केला आहे. राजकारण नको जीव महत्त्वाचा हे महत्त्वाचं आहे.
– ब्राझीलमध्ये पंचायत झाली आहे, मृत्यूदर दुप्पटीने वाढला आहे. विचित्र परिस्थिती आहे.
– रशियात लस आली आहे. फ्रान्समध्ये परिस्थिती नाजूक. तिथे पुन्हा लॉकडाऊन झाले आहे.
– परदेशात वर्क फ्रॉम होम बंधनकारण आहे.
– युकेमध्ये निर्बंध शिथील होत आहेत.
– लॉकडाऊन घातक आहे. पण कात्रीत आपण सापडलो आहे.- लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे.
– मास्क न लावण्यामध्ये काय शौर्य आहे. मास्क लावताना लाजायची गरज नाही.
– नवीन नियम लवकरच जाहीर करेल.
– खाजगी कार्यालयांना सूचना दिल्या आहेत.
– रेल्वे तुडूंब भरुन जात आहेत. हॉटेलमध्ये गर्दी आहे.
– जीव वाचवायचा की रोजगार. रोजगार परत मिळेल. जीव नाही मिळणार.
– संसर्गाची साखळी तोडायची आहे. लस घेतल्यानंतर ही कोरोना होता. तो दुसऱ्याला संसर्ग करु शकतो.

– कोरोनाची दहशत कमी झाली आहे. आपण गाफील झालो.

– कोरोनावर मात करायची आहे.
– पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा देत आहे.
– लाटे मागून लाट येत आहे.
– कोरोनाची लाट रोखून पुढची लाट रोखायची आहे. –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *