विवाहित मुलीला पळवलं; संतापलेल्या बापानं केली तरुणांची हत्या

झुंझनू येथील दुहेरी हत्याकांडाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. विवाहित मुलीला पळवून नेल्याच्या रागातून तिच्या वडिलांनी दोन तरुणांची कुऱ्हाडीनं वार करून निर्घृण हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. हत्या झालेल्यांमध्ये विवाहितेला पळवून नेणाऱ्या तरुणाचा भाऊ आणि मित्र होता.

झुंझनूतील बुहाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैतपुरा येथे दोन तरूणांची निर्घृण हत्या झाली होती. या घटनेनं पोलीसही हादरून गेले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या हत्येच्या घटनेचा छडा लावला. तरुणांची हत्या विवाहितेच्या वडिलांनी केल्याचं तपासात उघड झालं आहे. लग्न झालेल्या मुलीला पळवून नेल्याचा राग वडिलांच्या मनात होता. याच रागातून त्यांनी प्रियकराचा भाऊ आणि त्याच्या मित्राची हत्या केली.

या हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी हरियाणातून अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्यानं हत्येची कबुली दिली. मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाच्या आई-वडिलांची हत्या करण्याची धमकी आरोपीनं दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेतपुरा गावात दीपक आणि त्याचा मित्र नरेश हा घराच्या छतावर झोपले होते. त्यावेळी हरयाणातून आलेल्या आरोपी अनिलनं कुऱ्हाडीचे घाव घालून दोघांची निर्घृण हत्या केली.

मृत दोन्ही तरूण हे एकाच गावातील राहणारे आहेत. दोघे चांगले मित्र होते. लष्करात भरती होण्याचे दोघांचेही स्वप्न होते. सकाळी ते लवकरच धावायला जायचे. मात्र, या दोघांची हत्या झाली. दीपकचा मित्र नरेश हा काही दोष नसताना मारला गेला, असं बोललं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *