वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. आज दुपारी २ वाजता त्यांचा क्वारंटाईनचा कालावधी संपतोय. त्यांना ताब्यात घेण्याचे पत्र इंफोर्समेंट आणि सीबीआयला देण्यात आले आहे. सीबीआय त्यांना घेऊन जाईपर्यंत ते पोलीस खात्याच्या ताब्यात असतील. महाराष्ट्र शासन यांना कुठेही पळू देणार नाही.
