क्रिकेटवरून वाद; चाकूने मित्राचे डोळे फोडले

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरजित कश्यप असं मृत तरुणाचं नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याचं आरोपींशी क्रिकेटवरून भांडण झालं होतं. या वादातूनच ही हत्या झाली. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी सुरजितला घरातून बाहेर बोलावलं. त्याला एका निर्जन स्थळी घेऊन गेले आणि तिथे चाकूने भोसकून त्याची निर्घृण हत्या केली. चाकूने वार करून त्याचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. त्याचे डोळे फोडले होते. त्यानंतर त्याचा गळा चिरला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यावर मीठ टाकून तो खड्यात पुरण्यात आला होता.

सुरजित कश्यप संगम विहारजवळ जवाहर कॅम्प येथे राहत होता. एका फूड कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. सुरजितचा मोठा भाऊ अमितनं मंगळवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास तो हरवल्याची तक्रार दिली. नातेवाईकांनी त्याच्याबद्दल काही माहिती दिली होती. त्यावरून तपास सुरू केला. हत्येनंतर काही तासांनी सुरजितचा मृतदेह सापडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी पोलिसांनी सोमबीर सिंघल, विक्की झा, सतबीर आणि विक्की भट यांना अटक केली. गोलू आणि रवींद्र बिस्ट फरार आहेत. ‘त्याचा काटा काढला आहे,’ असं फोनवरून बोलताना विक्की झा याला सुरजितच्या एका मित्रानं पाहिलं होतं. याबाबत त्यानं पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचा संशय वाढला आणि त्या दिशेनं तपास सुरू केला. फोन कॉल्सच्या माहितीनरून घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी विक्की भट याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. सतबीर, गोलू आणि रवींद्रच्या मदतीनं सुरजितची हत्या केल्याचं त्यानं सांगितलं. सोमबीर आणि विक्की झाच्या सांगण्यावरून सुरजितचा काटा काढल्याची माहितीही त्यानं दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *