पती अंघोळ करीत नाही; पत्नीला हवा घटस्फोट

नवरा-बायकोच्या भांडणाला काही ठोस कारणाची गरज नाही. ते कधीही आणि कुठंही अगदी क्षुल्लक कारणावरून होऊ शकतं. भांडणाचं रुपांतर थेट घटस्फोटापर्यंतही जाऊ शकतं. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये याचा नुकताच प्रत्यय आलाय. नवरा दाढी करीत नाही, अंघोळ करीत नाही, घरात स्वच्छता पाळत नाही, या कारणावरून एका महिलेने थेट पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

भोपाळमध्ये राहत असलेल्या सिंधी समाजाच्या मुलानं ब्राह्मण समाजातील मुलीसोबत २०१६ साली विवाह केला. वर्षभरापर्यंत या दोघांच्या नात्यात कोणत्याही प्रकारे कटूता आली नाही. त्यांचा संसार सुखाचा चालला होता. परंतु, पतीनं दाढी वाढवली आणि या दोघांच्या नात्यात कटूता यायला सुरुवात झाली. पती दाढी करीत नाही. थंडीचं कारण पुढं करून तो अंघोळ करीत नाही. परफ्यूम लावून अंगाचा वास झाकण्याचा प्रयत्न करतो, असा आरोप करीत महिलेनं कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

माझे आयुष्य आहे. ते कसे जगायचे हे मी ठऱवेन. पत्नीनं मला सांगायची गरज नाही, अशा शब्दात पतीनं अधिकाऱ्यासमोरच पत्नीला सुनावलं आपलं म्हणनं मांडलं. बायकोच्या सांगण्यावरून आपण बदलणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं. दोघेही पती-पत्नी आपापल्या निर्णयावर ठाम असून अधिकारी घटस्फोट होऊ नये यासाठी त्यांचे काउसलिंग करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *