माळपठारावरील रोहडा येथील महिलेची उपवनवाडी शिवारात निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुसद तालुक्यातील रोहडा येथील जिजाबाई सुभाष कांबळे (50) या महिलेचा मृतदेह उपवनवाडी शिवारातील शेतात आढळून आला. महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर गंभीर घाव घालत तिची हत्या करण्यात आली आहे.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. महिलेची हत्या ही अनैतिक संबंध व पैशाचा वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, एनपीसी संजय चव्हाण, बिट जमादार जय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण याप्रकरणाचा अधिक तपास करत असून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.