वीजेची तार अंगावर पडून तीन गायींचा मृत्यू

विद्युत वाहक तारा अंगावर पडून तीन गाईंचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबरनाथ तालुकयातील शीळ गावात घ़डली. रामचंद्र बनवटे या शेतकऱ्याच्या तीन गायी गावाबाहेरील शिवारात चरत असताना अचानक महावितरणची विद्युत वाहक तार त्यांच्या अंगावर पडली.

वीजेच्या धक्क्याने या तिन्ही गाईंचा जागीच मृत्यू झाला. या विद्युत वाहक तारा पवार फार्म हाऊसला विद्युत पुरवठा करणाऱ्या होत्या. दुभत्या गायींचा मृत्यू झाल्याने  रामचंद्र बनवटे या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने गाई चारणारा गुराखी मात्र या अपघातातून बचावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *