वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची विटंबना

देशाचे पहिले गृहमंत्री आणि थोर स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची गांधीनगर जिल्ह्यातील शेरथा गावात विटंबना करण्यात आल्याची घटना घडली.

अज्ञात व्यक्तींनी पुतळ्याला शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांचा हार घातला होता. या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही तपासण्यात येत आहेत. या पुतळ्याजवळ होमगार्डचे दोन जवान आणि एका पोलिसाची नेमणूक करण्यात आली होती.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याहस्ते ऑक्टोबर १९९२मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *