मी अजून आठ-नऊ वर्षे खेळणार: विराट कोहली

सेंच्युरियन:

मी अजून आठ ते नऊ वर्षे क्रिकेट खेळणार आहे. या कालावधीत कठोर मेहनत घेणार आहे. देवाच्या कृपेने मी तंदुरुस्त आहे, असे टीम इंडियाचा कर्णधार म्हणाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका विजयानंतर तो आत्मविश्वासाने बोलत होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन – डे मालिकेत विराटची बॅट तळपली आहे. सेच्युरियनमध्ये सहाव्या वन-डे सामन्यात त्याने शतकी खेळी केली. कारकिर्दीतील हे ३५ वे शतक होते. त्याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सहज विजय मिळवला. विजयानंतर विराटने आनंद व्यक्त केला. बॅटींग करताना खूप मस्त वाटत होतं. येणाऱ्या चेंडूवर टायमिंग साधण्याचा प्रयत्न केला, असं तो म्हणाला.

माझ्या कारकिर्दीतील आठ ते नऊ वर्षे अजून शिल्लक आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. या दरम्यान मला कठोर मेहनत करायची आहे. देवाच्या कृपेने मी फिट आहे. देशासाठी खेळण्याची संधी मिळाली आहे. माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. संघानेही जबरदस्त कामगिरी केली, असेही तो म्हणाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *