रत्नागिरीत कारने ५ गाड्यांना चिरडले

एसटी स्टँण्डसमोर अपघाताचा भयानक थरार पाहायला मिळाला. कुवारबावहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या कारने पाच वाहनांना चिरडत नेले.

कारचालक कुवारबावपासून सुसाट रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. पहिल्यांदा जयस्तंभ परिसरातल्या एका दुचाकीला उडवून कार पुढे गेली. एसटी स्टँण्डसमोर आल्यानंतर गाडी रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या रेलिंगवर घातली. या ठिकाणाहून गाडी उडाली. त्यानंतर ताबा सुटलेल्या गाडीने समोर येईल त्या वहनाला भरडत नेले.

तीन दुचाकी आणि एक सुमो गाडीला धडक देवून कार थांबली. मात्र तोपर्यंत अनेक जण या अपघातात चिरडले गेले होते. अपघातग्रस्त दुचाकीवरील पाच जण जखमी झाले. यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *