टँकरची ट्रकला जोरदार धडक, तीन ठार

पुणे-सोलापूर महामार्गावर उरूळी कांचन येथे आज पहाटे ४ वाजता भीषण अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या वाळूच्या ट्रकला पाठिमागून आलेल्या भरधाव टँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीनजण ठार झाले तर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

वाळूच्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्याचा भाऊ महेश यांनी रस्त्याच्याकडेला ट्रक उभा केला. त्यानंतर हे दोघेही टायरची पाहणी करत होते. इतक्यात पाठीमागून आलेल्या भरधाव टँकरने या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत, ट्रक चालक शैहफान दशरथ शेख आणि टँकर चालक एकनाथ विश्वनाथ बाचारे या तिघांचा मृत्यू झाला. तर टँकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे, राजू विश्वनाथ पंडीत, कांताबाई मरीबा उजगर, इंदु राजु पंडित जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघात होताच सावध झालेल्या महेशने तात्काळ जागेवरून पळ काढल्याने तो या अपघातात बचावला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *