गरम पाण्यात पडून ३ वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

औरंगाबादमधील शांतीपुरा परिसरातील ख्रिस्तीनगर येथे जॉय जोएल उमाप या ३ वर्षीय मुलाचा गरम पाण्यात पडून मृत्यू झाला. जॉयवर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ख्रिश्चन धर्मियांचा इस्टर (पास्का) हा सण रविवारी साजरा करण्यात आला. जॉयच्या कुटुंबियांत देखील या उत्सवाची धूम होती. उत्सवाच्या निमित्ताने चिकन बिर्याणीचा मेनू तयार करण्याच काम सुरु होतं. यासाठी गरम करण्यात येणाऱ्या पाण्यात पडून जॉय भाजला होता.

घटनेनंतर त्याला तात्काळ औरंगाबाद घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांना यश आले नाही. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. जॉयच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *