जालना येथे उष्माघाताने महिलेचा मृत्यू

जिल्ह्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे. उष्माघातामुळे लक्ष्मीबाई गवई या ६५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू  झाला.

जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव गावामध्ये ही घटना घडली. जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेवच्या लक्ष्मीबाई गवई या त्यांच्या मुलीकडे खाजगी कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. हा कार्यक्रम आटोपून गावी परत येताना त्यांना उष्माघात झाला.

तातडीने खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या तिन दिवसांपासून दररोज जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात उन्हाचा कडाका वाढत चाललाय. त्याचा फटका नागरीकांबरोबरच पशुपक्षांना देखील बसू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *