तीन महिन्यानंतर खुनाचा तपास लावण्यात पोलिसांना यश

नाशिकच्या सातपूर परिसरात तीन महिन्यापूर्वी झालेल्या खुनाचा तपास  लावण्यात नाशिक  पोलीस यशस्वी झालेत.

सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून प्रियकरानेच विवाहित महिलेचा खून केल्याचं स्पष्ट झालंय. डिसेंबर महिन्यात सातपूरच्या वासाळी शिवारात तीक्ष्ण हत्याराने वार केलेला आणि अर्धवट जळालेला महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मात्र खुनाचा सुगावा लागत नव्हता.

तपासाची चक्र फिरवून या प्रकरणाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. या महिलेचे लग्न झाले होते. तरीही तिचे मनिष गिरासे याच्याशी प्रेमसंबंध होते.

ती त्याच्यासोबत राहत होती. मात्र ती प्रियकराकडे सतत पैशांची मागणी करत होती. त्यामुळे रागाच्या भरात मनिषने महिलेची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *