दीड कोटी ७/१२ उताऱ्यांचे ई फेरफार पूर्ण
राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांच्या संगणीकरणाची आणि ई पेरफार नोंदीची कार्यवाही अंतिम टप्यात असून ३५८ पकी चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुका वगळता सर्व तालुक्यांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत एक कोटी ६२ लाक ९९ हजार ३३२ सव्र्हे क्रमांकांची ई-फेरफार कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. ई-फेरफार चे ९६ टक्के काम पूर्ण करणारा िहगोली जिल्हा राज्यात आघाडीवर असून संपूर्ण राज्यातील ई फेरफारचे काम येत्या एप्रिल पर्यंत पूर्ण होईल असा दावा महसूल विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
शेतकऱ्यांच्या दृष्टिने जमिनीचा ७/१२ चा उतारा हा अतिशय महत्वपूर्ण दस्ताऐवज आहे. शेतकऱ्यांच्या मालमत्तेची बिनचूक माहिती त्यांना तत्काळ आणि घर बसल्या मिळावी या हेतूने राज्यातील जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांचे संगणकीकरण व ई-फेरफार करण्याची मोहिम महसूल विभागाने सुरू केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत राज्यातील एकूण दोन कोटी ४८ लाख १३ हजार ६५८ सव्र्हे क्रमांकापैकी एक कोटी ६२ लाख ९९ हजार ३३२ सव्र्हे क्रमांकाचे ई फेरफारचे काम पूर्ण झाले आहे. िहगोली, गोंदिया, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, भंडारा, जालना, लातूर, औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, परभणी, नांदेड या १३ जिल्हयांमध्ये ई फेरफारचे काम ९० ते ९६ ते टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. तर नंदुरबार, नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, मुंबई उपनगर, वर्धा, नाशिक, कोल्हापूर, बीड, ठाणे, सोलापूर या १२ जिल्’ाांमध्ये ९० टक्केच्या आसपास काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम झाले आहे. या डाटाच्या अधारे ७/१२ उतारे महाभूलेख htp://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागपूर, वर्धा व नाशिक या तीन जिल्हयातील डिजिटल स्वाक्षरी केलेले ७/१२ उपलब्ध असून आपले सरकार या वेब पोर्टलवरुनही ते घेता येता येतील. नागपूर व पालघर या जिल्हयात ७/१२ वेंडीग मशीन (किओस्क) वरुन सामान्य जनतेला हे उतारे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. राज्यात आतापर्यंत ई फेरफारचे ६६ टक्के काम पूर्ण झाले असून ते एप्रिल अखेपर्यंत पूर्ण होईल असा विश्वासही अधिकाऱ्याने व्यक्त केला.