नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन एक महिना लोटला तरी, बॅंकांसमोर लागणाऱ्या रांगा कमी होताना दिसत नाहीत. सामान्य माणूस अद्यापी कॅशलेस असल्याचे चित्र शहरात सगळीकडे दिसत आहे. सुरू असलेल्या काही मोजक्या एटीएमसमोर नागरिकांची गर्दी वाढत असून दिल्लीच्या उत्तरेकडील भागातील स्थितीतही काही बदल झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या भागातील विद्यार्थ्यांसमोरच्या अडचणी वाढल्या असून, “आम्हाला नकोय असला विकास की, स्वतःचे पैसे काढण्यासाठी आम्हाला ताटकळत रांगेत उभे राहावे लागेल,‘ अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थ्यांने बोलताना दिली आहे.