केंद्र सरकारनं नोटाबंदी केल्यानंतर देशभरात लहानमोठ्या घटना रोजच्या रोज घडतायत. उत्तरप्रदेशातल्या मुरादाबादमध्ये स्थानिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये तोडफोड केली.
एटीएम बंद असल्यानं लोकांची भिस्त सध्या बँकेतल्या कॅशियरवरच आहे. मात्र बँकेत असलेली रोख रक्कम संपल्यानंतर तसा बोर्ड बँकेत लावण्यात आला.
त्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी शाखेमध्ये जोरदार तोडफोड केली.
