राज्यात आठवीपर्यंत ‘ढकलगाडी’ बंद होणार?

आठवीपर्यंत पास करण्याचे धोरण आता राज्यांवर असणार आहे. आठवीपर्यंत ढकलगाडी बंद करण्यासंदर्भातला निर्णय राज्यांवर सोडण्यात आल्याचं केंद्रीय मुनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्यात शिक्षण मंत्री या ढक्कलगाडीविषयी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

राज्यात विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नाही. त्यामुळे शिक्षणाच्या दर्जात आणि गुणवत्तेत मोठी घसरणही पाहायला मिळतेय. म्हणून ही ढकलगाडी बंद करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण पुरवण्याची जबाबदारी केंद्रानं राज्यावर सोपवली आहे. दरम्यान, याबाबत केंद्राने निर्णय घेण्याचा चेंडू राज्याच्या कोर्टात टाकला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *