नजरचुकीनं एलओसी पार गेलेले भारतीय जवान चंदू चव्हाण जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, कुटुंबियांनी केला आहे.एलओसी पार करुन चंदू पाकिस्तानात गेल्याची बातमी समजताच त्यांच्या आजीचा धक्क्यानं मृत्यू झाला. आज आजीचा दशक्रिया विधी असून, चंदू परतल्याशिवाय आजीच्या अस्थी विसर्जन न करण्याचा निर्धार, चंदूचे मोठे भाऊ आणि कुटुंबियांनी केला आहे.
27 आणि 28 सप्टेंबरच्या रात्री भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील 7 तळांना उद्ध्वस्त झाली. यामध्ये 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 2 पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या रात्रीतच चंदू चव्हाण हे नजरचुकीने पाकिस्तानात पोहोचल्याचं उघड झालं. खुद्द पाकिस्तान संरक्षण मंत्रालयानेच याबाबतची माहिती ट्विट करुन दिली होती.