ओडिशातील गोलामुंडा जिल्ह्यातील डोकरीपाडा गावातील गोलमुंडा प्रभागात शनिवारी ही दु:खदायक घटना आली. येथील एका गरीब कुटुंबातील 75 वर्षे वयाच्या एका महिलेचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या महिलेला चार मुली होत्या. आई जाण्याचे दु:ख बाजूला ठेवून त्या मुलींनी आईच्या अंत्यविधीसाठी शेजाऱ्यांकडे मदतीची याचना केली. मात्र मदतीसाठी कोणीही समोर आले नाही. अनेक तास वाट पाहिल्यानंतर ज्या लाकडाच्या पलंगावर आईचा मृतदेह ठेवला होता तो पलंग मुलींनी तसाच स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही आईला दहन करण्यासाठी लाकडांचा प्रश्न होताच. शेवटी ज्या घरात हे कुटुंब राहात होते त्या घराच्या लाकडाचे छत काढून या मुलींनी आईला पंचतत्वात विलीन केले. या चार मुलींपैकी दोन मुली विधवा आहेत. तर दोन मुलींना त्यांच्या पतींनी सोडून दिले आहे. त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याचे त्या भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या.
घराचे छत काढून केले आईवर अंत्यसंस्कार
मृत्युनंतरही दारिद्य्र पाठ सोडत नसल्याचे काही उदाहरणे समोर येत असताना त्यामध्ये आणखी एका प्रकाराची भर पडली आहे. ओडिशातील एका गरीब कुटुंबातील मुलींना आपल्या आईच्या अंत्यविधीसाठी स्वत:च्या घराचे लाकडाचे छत काढावे लागण्याची दु:खदायक घटना समोर आली आहे.