बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं नद्यांना पूर आलाय. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलंय.

पावसामुळे काही गावांचा संपर्कही तुटलाय. उमरी पारगावमध्येही पाणी आल्याने गावात 500 नागरिक अडकलेत. सरस्वती नदीलाही पूर आलाय.

गेवराई तालुक्यातल्या चोपड्याची वाडी, राजापूर गावात पाणी शिरलंय. त्यामुळं गावाचा संपर्क तुटलाय. तर जालना जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय. जालना, भोकरदन, अंबड, घनसावंगी जाफराबाद तालुक्यातही जोरदार पाऊस कोसळतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *