पाक कलाकारांना देशातून हाकलून द्या- अभिजीत

उरी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडून जाण्याचा फतवा केल्यानंतर आता गायक अभिजीतनेही ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांना हाकलून देण्याची मागणी केली आहे.
 
उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावानंतर आता मनसेने पाकिस्तानी कलाकारांना भारत तातडीने सोडण्याचा फतवा काढला. देश सोडून हे कलाकार न गेल्यास चित्रीकरण थांबविण्याचा इशारा मनसेने दिला आहे. शाहरुखअभिनित “रईस‘ चित्रपटात काम करणारी अभिनेत्री माहिरा खान आणि “ऐ दिल है मुश्‍कील‘ चित्रपटातील अभिनेता फवाद खान यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांमुळे भारतीय कलाकारांची संधी हिरावून घेतली जात असल्याचा आरोप मनसेने केले आहे.
 
याविषयी आपले मत व्यक्त करताना अभिजीत म्हणाला की, पाकिस्तानी कलाकारांना देशाबाहेर हकलले पाहिजे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना आपल्या देशात का काम करु दिले जात आहे. राजकीय पक्ष छोट्या-मोठ्या गोष्टींचे राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण, करण जोहर, महेश भट्ट, खान्स यासारख्या देशद्रोहींविरोधात जाण्याची हिंमत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *