जगण्याचा गमावला अधिकार

जगण्याचा गमावला अधिकार

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी संचालक यांनी यावेळी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. ‘सोनिया गांधी, मनमोहन सिंग हे दोघे भामटे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नरसंहारक आहेत. या तिघांनाही जगण्याचा अधिकार नाही’, असे काटजू यांनी म्हटले आहे.

फेसबूक आणि ट्विटरच्या अधिकृत अकाऊंटवरून काटजू यांनी ही टिपण्णी केली आहे. ‘घोटाळ्यांवर घोटाळे करून देशाची लूट करणारे सोनिया गांधी व मनमोहन सिंग हे ठग आहेत, तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार घडवणारे मोदीही  धोकेबाज आहेत. या तिघांना जगण्याचा अधिकार आहे का? त्यांच्या कर्मांमुळे त्यांनी जगण्याचा अधिकार गमावला आहे’, असे काटजूंनी त्यांच्या पोस्ट्समध्ये म्हटले आहे.
त्यांच्या या वक्तव्याबाबत नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र तरीही काटजू आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *