जोरदार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

जोरदार पावसामुळे आज धावत्या मुंबईचा वेग मंदावला. गुरुवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घातलाय.

या जोरदार पावसामुळे लोकलच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालीये.मध्यरेल्वेची वाहतूख सकाळपासूनचं रखडत सुरु आहे.

माटुंगा ,सायन, कुर्ला स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रॅक पाण्याने भरले असल्यामुळे अतिशय मंद गतीने मध्यरेल्वेची सेवी सुरु आहे. जलद मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून तेथील वाहतूक २०-२५ मिनिटे उशिराने सुरु आहे.

तर, हार्बरचीही तीच परिस्थिती आहे, पश्चिम रेल्वेसेवाही उशिरानं सुरु आहे, अर्थात याचा परिणाम फक्त लोकलवर न पडता, लांबपल्ल्याच्या गाड्यांवरसुध्दा झाला दिसतोय. पहाटेपासूनचं सुरु असलेल्या संततधार पावसामुळ मुंबईतल्या रस्ते वाहतुकीवरसुध्दा परिणाम पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *