सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातातील शोधकार्य अद्यापही सुरूच असून आज (शुक्रवार) आणखी आंबेत खाडीत आणखी तीन मृतदेह सापडले आहेत.
आज घटनास्थळावरून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेत खाडीत तीन मृतदेह सापडले. या अपघातातील आतापर्यंत 17 मृतदेह सापडले आहेत. मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने सावित्री नदीच्या पूरात वाढ झाली असून शोधकार्यात अडचणी येत आहे. मात्र तरीही शोधकार्य सुरूच असल्याचे वृत्त आहे.