सासूचा जावयावर जडला जीव, कोर्ट मॅरेजकरुन परतले घरी

बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात पुरैनी गावामध्ये सासू आणि जावई या पवित्र नात्याला कलंक लावणारी एक घटना समोर आली आहे. पुरैनी गावामध्ये रहाणा-या आशा देवी यांचा आपल्याच मुलीच्या नव-यावर जीव जडला. आपल्या मुलीच्या संसाराचा विचार करुन आशा देवीने खरतर तिथेच थांबायला हवे होते.
पण परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जावयाने आणि सासूने एक पाऊल पुढे टाकत विवाह केला. कोर्टात विवाह करुन हे दोघे घरी परतले तेव्हा समोरचे दृश्य बघून मुलगी चक्कर येऊन खाली कोसळली. कोर्टातील काही वकिलांनीच साक्षीदार म्हणून सासू आणि जावयाच्या विवाहाच्या कागदपत्रांवर स्वाक्ष-या केल्या.
लग्नानंतर काही दिवसांनी जावई सूरज आजारी पडला. त्याला बघण्यासाठी म्हणून आशा देवी मुलीच्या घरी गेली. त्यावेळपासून दोघांमध्ये प्रेमाची सुरुवात झाली. दोघांमध्ये तासनतास फोनवरुन बोलणे व्हायचे. सूरजचा सासरा दिल्लीमध्ये फॅक्टरीमध्ये नोकरी करायचा. आशा आणि सूरज दोघे इतके जवळ आले की, एकदिवस सूरज पत्नीला घरी सोडून आशाच्या घरी रहायला गेला.
गावात दोघांच्या लग्नाची बातमी मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी पंचायत बसवली. त्यात जावई आणि सासूचे परस्परांवर भरपूर प्रेम असल्यामुळे पंचायतीने दोघांच्या बाजूने निकाल दिला. सूरजची पत्नी ललिता आता वडिलांबरोबर रहाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *