मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात पूरस्थिती

नाशिक जिल्ह्यामध्ये रात्रभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे दुथडी भरुन वाहत असली तरी, यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर धरणातून पाण्याचा विर्सग सुरु असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून,  रामसेतू आणि दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेले आहे.
नाशिक गंगापूर धरणातून 12 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने रामकुंड परिसर पुराच्या पाण्याखाली गेला आहे. राज्यातून आलेल्या अनेक नागरिकांना रामकुंडा ऐवजी मालवीय चौकात दशक्रिया विधी करावा लागला आहे.
परिसरातील भांडी बाजारातही पुराचे पाणी शिरले आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये असं आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *