बांग्लादेशात दहशतवादी हल्ला आणि त्याचा भारतावर परिणाम

मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे.

बांगलादेशची राजधानी ढाक्यात १ जुलैला शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे इसिसचा नाही, तर बांग्लादेशातीलच जमायतुल मुजाहिदीन या

अतिरेकी गटाचा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात आहे, असे बांग्लादेशचे गृहमंत्री असादुझमन खान यांनी सांगितले.

मी सांगू इच्छितो की, बांग्लादेशात इसिस किंवा अल् कायदाचे अस्तित्व नाही. ज्या अतिरेक्यांनी नागरिकांना ओलिस धरले होते, ते आमच्याच देशातील आहेत. आम्ही त्यांनाच नाही, तर त्यांच्या पूर्वजांनाही चांगले ओळखतो. ते सर्व याच मातीत मोठे झाले आहेत आणि या हल्ल्यासाठी त्यांना पाकच्या आयएसआयकडून सर्व प्रकारची मदत पुरविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *