मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करताना दोघे वाहून गेले, अर्नाळा किनाऱ्यावरील घटना

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करताना दोघे वाहून गेले, अर्नाळा किनाऱ्यावरील घटना

वसई-विरारमध्ये काल पावसाने थोडी ऊसंत घेतली असली, तरी सागराने मात्र आपला कहर सुरूच ठेवला आहे. मैत्रिणीच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेले 5 जण समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याची धक्कादायक घटना अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर घडली आहे. स्थानिकांनी तिघांना वाचवलं आहे, मात्र दोन युवक अद्याप बेपत्ता आहेत. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

विरारच्या गोपचरपाडा येथील पाच मित्र मैत्रिणी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर गेले होते. समुद्राच्या पाण्यात मज्जामस्ती करत असताना आलेल्या मोठ्या लाटेत सर्वजण वाहून गेले.

मात्र स्थानिकांनी प्रसंगावधान राखल्याने तिघांना वाचवण्यात यश आले असून दोघे अद्याप बेपत्ता आहे. आशिष मोहिते अक्षय मोरे अशी या युवकांची नावं आहेत. पोलीस प्रशासन तटरक्षक दलाच्या मदतीचे त्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *