आला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी?

आला पावसाळा, डोके वर काढणाऱ्या आजाराबाबत ही घ्या काळजी?

मुंबईत उशिरा का होईना दाखल झालेल्या पावसानं मुंबईकरांची घामांच्या धारांतून सुटका केली असली तरी पावसासोबत येणाऱ्या आजारांनी मात्र आता डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे.

आकडेवारींचा आधार घेतला तर मागील वर्षीच्या तुलनेत शहरात साथीच्या आजाराने ग्रस्त रूग्णांची संख्या यंदा कमी आहे. लेप्टोस्पायरसीसचे सहा रूग्ण आढळल्याने बीएमसीचा आरोग्य विभाग अलर्टवर आहे.

पावसाळ्यात विविध आजारांची साथ पसरणं ही काही नवी गोष्ट नसली तरी यंदा उशिरा आलेल्या पावसामुळं मुंबईला या आजारांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पण आता मान्सून दाखल झाल्यानं साथीचे विविध आजार फैलावू शकतात. मागील वर्षीच्या तुलनेत साथीच्या आजाराचे रूग्ण कमी आढळून आलेत.

मागील वर्षी १६ जूनपर्यंत तापाचे १०२ रूग्ण आढळले होते. ते यंदा ७९ आढळलेत. तर गँस्टृोचे मागील वर्षी १०२३ रूग्ण होते, ते यंदा ५७९ आहेत. कावीळचे ९९ होते, यंदा ८२ आहेत. मलेरियाचे ६०९ होते,यंदा २८० आहेत. डेंग्यूचे ३८ होते, ते यावर्षी २७ आहेत. लेप्टोस्पायरिससच्या रूग्णांची संख्या मात्र मागील वर्षी ४ होती, ती आता ६ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *