आयपीएलच्या नवव्या हंगामातील अंतिम सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स फ्रँचायझींसोबत शुक्रवारी चर्चा केल्यानंतर मुंबईत होणा-या अंतिम लढतीसह (२९ मे) पहिला ‘क्वालिफायर’ बंगळुरुत खेळवण्याचे ठरले आहे.
दुष्काळग्रस्त स्थिती पाहता मे महिन्यात होणा-या महाराष्ट्रातील लढती अन्यत्र खेळवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिला आहे.
न्यायालयाच्या निर्णयाचा फटका मुंबई, पुणे आणि नागपूरमधील मिळून १३ सामन्यांना बसला आहे. अंतिम लढत मुंबईत होती. मुंबईसह पुणे फ्रँचायझीला नवे ‘होमग्राऊंड’ म्हणून रायपूर, जयपूर, विशाखापट्टणम आणि कानपूर असे चार पर्याय देण्यात आले आहेत.