महाराष्ट्रात एलईडी बल्ब आता 85 रुपयांत

वीजेची बचत करणाऱ्या एलईडी बल्ब आता महाराष्ट्रात ग्राहकांना 100 रुपयांऐवजी 85 रुपयांना उपलब्ध होणार आहेत. एनर्जी एफशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (ईईएसएल) ‘उन्नत ज्योती बाय अॅफॉर्डेबल एलईडीज् फॉर ऑल” अर्थात ‘उजाला‘ योजनेअंतर्गत नव्याने 54.90 रुपयांना हे बल्ब खरेदी केले आहेत. त्यामुळे सर्व राज्यांना थेट किंमतीचा लाभ हस्तांतरित होणार आहे.
 
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन आणि पॉवरग्रिड या सरकारी उर्जा कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून ईईएसलची स्थापना करण्यात आली आहे. 
 
प्रशासकीय खर्च, वितरण आणि जनजागृती खर्च व राज्यांमधील विशिष्ट कर गृहीत धरुन देशभरात एलईडी दिव्यांची किंमत 75 ते 95 रुपयांदरम्यान आहे. राज्यांतील विशिष्ट करांमुळे प्रत्येक राज्यात एलईडी दिव्यांची शेवटची किंमत वेगळी आहे. परंतु तेथील स्थानिक करांमुळे वितरणाची किंमतदेखील वेगवेगळी आहे, अशी माहिती ईईएसएलने सादर केलेल्या निवेदनात दिली आहे. 
 
सरकारने यंदा वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी ऑनलाईन मंचाचा वापर केला आहे. त्यामुळे व्यवहारांसाठी लागणाऱ्या वेळ व पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक निविदा सादर झाल्या व स्पर्धेतून दिव्यांची किंमत कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 1.35 कोटी एलईडी बल्बचे वितरण झाले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *