पाकिस्तानविरोधात भारताने कोणत्याही प्रकारची लष्करी कारवाई करू नये यासाठी पाकिस्तानने ११० ते १३० अण्वस्त्रे भारताच्या दिशेने रोखली असल्याचे अमेरिकी सिनेटच्या अहवालात नमूद केले आहे.
भारताला लष्करी कारवाईपासून रोखण्यासाठी पाकिस्तान आण्विक संघर्ष निर्माण करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या रिसर्च सíव्हस अहवालात भारताला मुख्यत: लष्करी कारवाईपासून परावृत्त करण्यासाठी पाकिस्तान अण्वस्त्रे रोखून आहे.
पाकिस्तानकडे किमान ११० अण्वस्त्रे असल्याचे या अहवालात ठामपणे म्हटले आहे. पाकिस्तान अण्वस्त्रांमध्ये वाढ करत आहे, त्याचप्रमाणे अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांमध्येही भर टाकत असल्याचे दिसून आले आहे.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ताब्यात अणू तंत्रज्ञान लागू शकते, असा धोकाही या अहवालात राष्ट्रीय तपास संस्थेने नमूद केलेला आहे.