भारतातील विमानतळावरून ३२ कोटींचा ऐवज हरवला

भारतातील विमानतळावरून ३२ कोटींचा ऐवज हरवला

२०१५ मध्ये भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करणा-या प्रवाशांचा ३२ कोटींचा ऐवज हरवला आहे. या हरवलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल, मौल्यवान वस्तू आणि पैशांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकृत आकडेवारीतून समोर आली.

२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हरवलेल्या ज्या वस्तूंचा कोणत्याही व्यक्तीने दावा केला नाही, अशा वस्तूंची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने गोळा केली. या माहितीच्या आधारे त्यांनी देशातील ५९ नागरी विमानतळावर सुरक्षा ठेवली पाहिजे, असे निदर्शनास आणून दिले.

विमानातून प्रवास करणा-या प्रवाशांचे अलंकार, लॅपटॉप, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पैसे आणि विविध वस्तू हरवल्या होत्या. त्यांची एकत्रित किंमत जवळपास ३२.१५ कोटी होती.

या हरवलेल्या वस्तू केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ताब्यात घेतल्या होत्या. यानंतर त्यांनी या वस्तू विमानतळावरील कार्यकारी अधिका-यांना सुपूर्द केल्या. पडताळणी केल्यानंतर त्यांचा ऐवजातील परत करणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.

निमलष्करी दलाने या वस्तूंचे मूल्यांकन केल्यानंतर या वस्तू ताब्यात घेण्यात आल्या होत्या. सीआयएसएफच्या संकेतस्थळावर आपल्या हरवलेल्या वस्तूंची यादी तपासावी. आपली वस्तू या यादीत असेल तर ती वस्तू त्या मालकाला परत मिळवता येईल.

विमानतळावर ज्या सुरक्षा रक्षक दलाच्या तुकडय़ा कार्यरत आहेत त्यांनी याच माहितीबरोबर सांगितले की, विमानतळावरील सुरक्षेबाबत २०९ प्रकरण झाली आहेत. सुरक्षा दलांनी काही प्रवाशांच्या सामानातून दारूगोळा आणि विविध स्फोटके ताब्यात घेतली. याचबरोबर विमानतळावरील सुरक्षा वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या २०९ प्रकरणांपैकी त्यांनी २०४ प्रकरणांमध्ये प्रवाशांच्या बॅगेतून दारूगोळा जप्त केला होता.

सध्या सीआयएसएफ ५९ नागरी विमानतळावर सुरक्षा देण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी त्यांनी विशेष सुरक्षा रक्षक दल तयार केले असून यासाठी पुरुष महिलांची नेमणूक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *