कोल्हापूरचा टोल मुक्त, अखेर कोल्हापूरकरांचा विजय

कोल्हापूरचा टोल मुक्त, अखेर कोल्हापूरकरांचा विजय

कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे, टोल बंद करण्याची घोषणा झाल्याने अखेर कोल्हापूरकरांचा विजय झाला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने वर्षभरापासून कोल्हापूरचा टोल बंद करू असं म्हटलं होतं, पण टोल बंद झाला नव्हता.

अन्यायकारक टोल बंद करण्यासाठी कोल्हापूरकरांनी सर्वपक्षीय आंदोलन छेडलं होतं, याविषयी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, कोल्हापूकरांना लाठ्या काठ्यांचा मारही खावा लागला होता.

कोल्हापूरचा टोल बंद करण्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. कोल्हापूरचा टोल बंद करण्याची मागणी अनेक दिवसापासून होत होती, कोल्हापूरकरांनीही यासाठी सुरूवातीपासून आंदोलन सुरू ठेवले होते.

कोल्हापूरकरांना यासाठी वेळोवेळी भांडावे लागले होते, संघर्ष करावा लागला होता, अखेर या संघर्षाला यश आल्याचं म्हणता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *