कोल्हापूरमध्ये एका विवाहीत दांम्पत्याची अत्यंत क्रूर पद्धतीने गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इंद्रजीत आणि मेघा कुलकर्णी अशी मृतांची नावे असून, अलीकडेच जून महिन्यात दोघांनी प्रेम विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह असल्याची माहिती मिळत असून, कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता.
घरच्यांचा विरोध डावलून हा विवाह झाल्यामुळे ऑनर किलिंगमधून ही हत्या घडवण्यात आल्याची दाट शक्यता आहे. विवाहानंतर इंद्रजीत आणि मेघा कसबा बावडा परिसरातील गणेश नगरमध्ये घर भाडयाने घेऊन रहात होते. बुधवारी रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या खोलीतून ओरडण्याचे मोठे आवाज ऐकू आले.
त्यामुळे शेजा-यांना त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा इंद्रजीत आणि मेघा रक्ता्च्या थारोळयात कोसळलेले होते. आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन दोघांची हत्या केली. लगचेच पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. ऑनर किलिंगच्या अंगाने सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.