मुंबई लोकलमधून पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. ही घटना आज संध्याकाळी ६च्या सुमारास घडली. डोंबिवली ते दिवा दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवास मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकलमधून पडून आशिष शंकर शेणे या १६ वर्षीय या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बळी गेला. डोंबिवली ते दिवा दरम्यान कोपरजवळ ही दुर्घटना घडली. आशिष हा मित्रांसोबत डोंबिवलीकडे फिरालयला जात होता. पवईतील रहिवासी शंकर शेणे यांचा तो मुलगा आहे.