भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारपासून फिरोजशा कोटला मैदानावर होणा-या या कसोटी सामन्यात अमित मिश्रा ऐवजी उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. भारताची मालिकेत २-० अशी विजयी आघाडी आहे. अंतिम कसोटी सामना जिंकण्याचा भारताचा प्रयत्न राहील.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या आणि अंतिम कसोटी सामन्याला फिरोजशा कोटला मैदानावर सुरूवात होत आहे.
फिरकीला (स्पिन) अनुकूल खेळपट्टय़ांवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची तारांबळ उडाली तरी तिस-या कसोटीतील खेळपट्टीला ‘वाईट’ दर्जा दिल्याने विदर्भ क्रिकेट असोसिएशनसह (व्हीसीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अडचणीत आले आहे. त्यामुळे दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) फिरोजशा कोटला मैदानाची खेळपट्टी कशी असेल, याची उत्सुकता आहे.
नागपूर कसोटी जिंकता दक्षिण आफ्रिकेच्या परदेशातील नऊ मालिका विजयांच्या कामगिरीला ‘ब्रेक’ लावला. दिल्ली ‘सर’ केल्यास यजमानांचा प्रतिस्पर्ध्याविरुद्धचा तो सर्वात मोठय़ा फरकाने मिळवलेला विजय असेल. आणखी एक पराभव दक्षिण आफ्रिकेचे अव्वल स्थान धोक्यात आणू शकतो. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याची पाहुण्यांना शेवटची संधी आहे.