११६ धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत

शिखर धवन(१२),मुरली विजय (४०), चेतेश्वर पुजारा (२१), अजिंक्य रहाणे (१३) आणि कर्णधार विराट कोहली (२२) हे आघाडीचे फलंदाज पटापाट बाद जाल्याने भारताचा निम्मा संघ अवघ्या ११६ धावांमध्ये तंबूत परतला आहे. मॉर्केलने भेदक गोलंदाजी करत ३ बळी टिपले तर हार्मर व एल्गरेन प्रत्येकी १ फलंदाज बाद केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताची सुरूवात तर चांगली झाली पण १५व्या षटकांत धवन अवघ्या १२ धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला. त्यानंतर चांगली खेळी करणाराा मुरली विजय (४०) धावांवर बाद झाला आणि भारताची स्थिती २१ षटकांत २ बाद ६९ अशी झाली. लंचनंतर ३० व्या षटकात चेतेश्वर पुजारा (२१) व त्यानंतर रहाणे (१३) आणि विराट कोहली (२२) एकापाठोपाठ एक असे तंबूत परतल्याने हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला जोरदार धक्के बसले.

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर बंगलोर येथे दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत संपला. मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने तीन दिवसांत विजय मिळवला तर बंगलोरमध्ये पहिल्या दिवसानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. त्यामुळे आफ्रिकेसाठी हा तिसरा सामना करो वा मरो असा असून भारतीय संघही दुस-या विजयासाठी उत्सुक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *