अमरावतीत अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपीटीने संत्रा हरभरा गहू पिकांचं मोठ नुकसान झालं आहे.

चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री, काटकुंभ, चुर्णी, हातरु या अतिदुर्गम भागात प्रचंड प्रमाणात गारपीट झाली आहे. या भागातील मुख्य पीक गहू आणि हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या गारपिटीमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे तर नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि सर्वेक्षण करण्याकरिता महसूल आणि कृषी विभागाने संयुक्त टीम पाठवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *