विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत; एअर इंडियाची न्यू इअर ऑफर

विमान प्रवास फक्त ८४९ रुपयांत; एअर इंडियाची न्यू इअर ऑफर

नववर्षानिमित्त विमान कंपन्यांनी विविध योजनांची घोषणा केली आहे. गो एअर, एअर एशिया या विमान कंपन्यांनंतर एअर इंडियानेही नववर्षानिमित्त प्रवासी भाडे योजना जाहीर केली आहे. एअर इंडियाच्या विमानातून प्रवाशांना फक्त ८४० रुपयांत प्रवास करता येणार आहे. या योजनेची सुरूवात मंगळवारपासून सुरू झाली आहे. या प्रवासी भाड्यात सर्व करांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेनुसार, २७ ते ३१ डिसेंबरपर्यंत तिकीटाची अगाऊ नोंदणी करता येऊ शकते आणि १५ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत प्रवास करता येणार आहे. १५ जानेवारीनंतर सुट्ट्य़ांची मजा लुटण्यासाठी जायचे असल्यास एअर इंडियाच्या या योजनेनुसार इकॉनॉमी श्रेणीतील एका बाजुकडील प्रवासासाठी ८४९ रुपये प्रवासी भाडे आकारले जाणार आहे.

एअर इंडियाची ही योजना १५ जानेवारी ते ३० एप्रिलपर्यंत लागू आहे. या कालावधीत प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रवाशांना ३१ डिसेंबरपर्यंत तिकीट बुकींग करता येणार आहे. चेन्नई-कोईमतूर आणि बंगळुरू-हैदराबाद या मार्गासाठी ८४९ रुपये प्रवासी भाडे आकारले जाणार आहे. विशेष म्हणजे यात सर्व करांचा समावेश आहे. याबाबतची माहिती कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

एअर इंडियाने नववर्षानिमित्त जाहीर केलेल्या योजनेनुसार, बंगळुरू – चेन्नई या मार्गावरील प्रवासासाठी १,१९९ रुपये भाडे आकारले जाणार आहे. मुंबई-गोवा या प्रवासासाठी १४९९ रुपये भाडे, मुंबई-बंगळुरूसाठी १५९९ रुपये, श्रीनगर – दिल्ली या मार्गासाठी १९९९ रुपये भाडे आकारले जाणार आहे. गोवा – दिल्ली या मार्गावर प्रवास करायचा असल्यास २९९९ रुपये भाडे आकारले जाणार आहे. तसेच गोवा-चेन्नई या मार्गावर प्रवास करण्यासाठी २१९९ रुपये भाडे आकारले जाणार आहे. या योजनेसंबंधी माहिती एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *