5 वर्षात मुंबईत रस्ते अपघातात 2500 लोकांचा मृत्यू

5 वर्षात मुंबईत रस्ते अपघातात 2500 लोकांचा मृत्यू

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गेल्या काही वर्षात रस्ते अपघातांमध्ये बळी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली आहे. गेल्या 5 वर्षात मुंबईच्या विविध ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात अडीच हजार लोकं मृत्यूमुखी पावली असून 22 हजाराहून अधिक लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानूसार मुंबईतल्या गेल्या 5 वर्षातली ही आकडेवाडी समोर आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत एकट्या मुंबई 37 टक्के अपघात होत असल्याची माहिती आहे. 2015 झाली या अपघाताच्या संख्येत तब्बल 3.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सहाजिकपणे या अपघातात मृत्यूमुखी पावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी रस्त्यावरुन चालण्यासाठी मुंबई खरच सुरक्षित आहे का? असा सवाल आता विचारण्यात येतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *