देशभरात आठ हजार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

देशभरात आठ हजार विद्यार्थ्यांच्या आत्महत्या

२०१४ मध्ये देशभरात तब्बल ८ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात घडल्याचे राज्यसभेत गुरुवारी सांगण्यात आले.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात ११९१ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी लेखी उत्तरात दिली.

एकूण विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या एकूण ८,०६८ घटना देशात घडल्या असून त्यापैकी राज्यांमध्ये ७,७५३ तर केंद्रशासित प्रदेशांत ३१५ घडल्या, असे इराणी यांनी सांगितले.

महाराष्ट्राखालोखाल तामिळनाडूचा क्रमांक लागत असून ८५३ आत्महत्या घडल्या तर पश्चिम बंगालमध्ये ७०९ आत्महत्या झाल्या. २०१३ मध्ये ८,४२३ आत्महत्यांच्या घटना घडल्या होत्या आणि तेव्हाही महाराष्ट्रातच सर्वाधिक आत्महत्या घडल्या होत्या. विद्यार्थ्यांवरील परीक्षांचा तणाव कमी होण्यासाठी अनेक उपाय केले असल्याचा दावा त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *