करोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा तीन मेनंतर आणि बारावीची परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
दहावी, बारावी परीक्षा नेमकी कधी?

